बुधवार, २४ जून, २०१५

धर्मनिरपेक्ष शासनाकडून काही अपेक्षा


धर्मनिरपेक्ष शासनाकडून काही अपेक्षा

१)    सर्व धर्मियांच्या सण – समारंभास कोणत्याही मंत्र्याने, विरोधी पक्षातील तसेच सभागृहात निवडून आलेल्या नेत्याने व शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहू नये. अपवाद पोलीस खात्याचा.
 

२)    कोणत्याही धर्मियांच्या सण – समारंभाच्या शुभेच्छा देऊ नये.
 

३)    धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या असल्यास सर्वसामान्य नागरीकाप्रमाणे धार्मिक स्थळी जावे. पदास अनुसरुन असलेला लवाजमा तसेच सुरक्षा रक्षकांचा ताफा जवळ बाळगू नये वा सोबत नेऊ नये.
 

४)    कोणत्याही धर्मियांच्या कार्यक्रमास एका रुपयाचाही शासकीय निधी देऊ नये.
 

५)    कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाच्या उभारणीस सरकारी खजिन्यातील एक रुपयाही खर्च केलं जाऊ नये.
 

६)    विविध धर्मांप्रमाणेच जातींनी नटलेल्या या देशातील महापुरुषांची स्मारके तसेच जयंती – पुण्यतिथी साजरी करण्याकरता सरकारने कोणतीही आर्थिक मदत, सवलत देऊ नये. त्याचप्रमाणे शासकीय सुट्टीही न दिली जावी.
 

७)    स्वातंत्र्योत्तर काळात ‘ राष्ट्रपिता ‘ वगैरे ज्या काही राष्ट्रीय अस्मितेशी निगडीत पदव्या आहेत त्यांची निःपक्षपाती चौकशी करून त्याविषयीचा अहवाल सर्वसामान्य जनतेच्या समोर जसाच्या तसा मांडण्यात यावा.
 

८)    मंत्री अथवा प्रशासकीय पदावर कार्यरत असताना पदाशी, कर्तव्याशी प्रामाणिक राहून कार्य करण्याचे प्रयत्न करावेत. जमत नसल्यास पदाचा राजीनामा देऊन तात्काळ सेवामुक्त व्हावे.
 

९)    शासनात सहभागी असलेल्या मंत्र्यांनी तसेच विरोधी पक्षातील व सभागृहात निवडून गेलेल्या नेत्यांनी पक्षनिष्ठा व चमचेगिरीला अवास्तव काय पण अजिबात महत्त्व देऊ नये.
 

१०)    निवडून आलेल्या सभागृहातील नेत्यांना जे दरमहा निर्वाह वेतन मिळते त्यातच त्यांनी आपला उदरनिर्वाह करावा. सर्वसामान्यांना ज्या सेवा ज्या किंमतीत मिळतात तशाच त्या नेत्यांनाही मिळाल्या पाहिजेत. अतिरिक्त फाजील सवलती अजिबात बंद केल्या जाव्यात.

थोडंफार सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षित असे वर्तन
 

१)    बौद्धिक गुलामगिरी टाळावी.
 

२)    राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी जर खरोखरच तुमचे काम चोखपणे करत असतील तरच त्यांची पाठराखण करावी. अन्यथा त्यांना सक्तीने घरी बसवण्याकरता प्रयत्न करावेत.
 

३)    भ्रष्ट, गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकीय नेते, प्रशासकीय कर्मचारी केवळ आपले जातभाई या कारणास्तव त्यांची पाठराखण करून नये.
 

४)    शेवटी हा देश, हे राज्य संपन्न झाले तर तुमच्याच पुढील पिढ्यांचे, वंशजांचे कल्याण होणार आहे हे पक्केपणी ध्यानी बाळगावे. तेव्हा आपल्या वंशजांच्या हितास हानिकारक, बाधा आणेल अशा प्रवृत्तींना अजिबात खतपाणी घालू नये.