सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

हायवे कॅनिबल्स ( भाग १ )



                              ( १ ) 


विनाशकाले विपरीत बुद्धी म्हटलं जातं. याचं प्रत्यंतर प्रशांतच्या बाबतीत दिसून आलं. 

त्या दिवशी मनाजोगतं गिर्यारोहण करून तो परत शहराकडे आपल्या घरी जायला निघाला होता. आजच्या ट्रेकिंगमधील हेरलेल्या निवडक स्पॉट्सची छायाचित्रं काढून त्याने आपल्या मित्रमंडळींना पाठवली होती. त्यांच्या पसंतीस आल्यास पंधरवड्यात तो पुन्हा त्यांच्यासोबत तिथे येणार होता.


ट्रेकिंगचं सामान तसेच मुक्कामासाठी घेतलेला छोटासा टेंट वगैरे साहित्य आवरून निघायलाच त्याला सात वाजले. आता येथून न थांबता निघाल्यास पाच सहा तासांचा रस्ता. सहा पदरी हायवे असल्याने ट्रॅफिकचे काही टेन्शन नव्हतं. लगेचच निघाला असता तर दुर्घटना टळली असती. परंतु…


.. रस्त्यात एक छोटंस गाव लागलं. तिथेच हायवेला येऊन मिळणाऱ्या, गावांतून येणाऱ्या रस्त्यांनी एक चौक बनला होता व सोयीस्कर जागा पाहून चहा - भजी, चायनीजच्या टपऱ्या तिथे स्थानिकांनी उभारल्या होत्या. अशाच एका टपरीवर थांबून प्रशांतने एक प्लेट भजी व कडक स्पेशल चहाचा आस्वाद घेतला. आता रस्त्यात कुठेही न थांबता प्रवास करण्यास तो सिद्ध झाला.


साधारणतः निम्म्याहून अधिक रस्ता कटला होता. अजून दीड एक तासाने प्रशांत घरी पोहोचणार होता. अर्ध्या तासाने शहरात प्रवेश करण्यापूर्वीचा हायवेचा शेवटचा टोल नाका त्याने क्रॉस केला. 

टोल प्लाझा क्रॉस केल्यावर नेहमी भरधाव निघणारा प्रशांत आज थोडा रमतगमत चालला होता. आणि इथेच त्याचा घात झाला.

टोलनाका पार केल्यावर काही अंतरापर्यंत रस्त्यावर दिव्यांच्या खांबांची मालिका होती व ती जिथे संपते, त्याच ठिकाणी एक तरुणी उभी होती.


प्रशांतने संथ गतीने तिच्या दिशेने गाडी घेतली व सहजगत्या बघावं तसं मनगटावरील घड्याळाकडे नजर टाकली. रात्रीचे साडेबारा होऊन गेले होते. या अशा वेळी एक तरुणी… ती देखील टोलनाक्यापासून इतक्या लांब… प्रशांतच अंतर्मन धोक्याची सूचना देत होतं परन्तु कारच्या हेडलाईट्सच्या प्रकाशात दिसणारी तरुणीची आकृती, तिचं सौष्ठव प्रशांतला भुरळ पाडत होतं.

तिच्याजवळ जाताच प्रशांतने गाडीला ब्रेक मारला व काच खाली घेतली. समोर गाडी उभी राहिल्याचे पाहताच ती तरुणी संथगतीने जवळ आली व बाहेरूनच, कारमध्ये डोकावत तिनं विचारलं, " मला शहरापर्यंत लिफ्ट द्याल का ? प्लिज.. "

काही न बोलता प्रशांतने दरवाजा अनलॉक केला.


खांद्याला अडकवलेली एक छोटी बॅग हातात घेत ती तरुणी आत येऊन बसली. तेवढ्या अल्पावधीतही प्रशांतने तिचं शक्य तितकं बारकाईने निरीक्षण केलं. 

चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळल्याने तिचा चेहरा जरी त्याला दिसला नसला तरी जवळपास पाच सव्वा पाच फूट उंचीचा तिचा मध्यम बांधा व कमरेखालचा तिचा समोरून दिसणारा भाग त्याला मोहवून गेला. नाही म्हणलं तरी तिलाही त्याची आपल्या कमरेखाली गुंतलेली नजर जाणवली होती. त्यामुळे तिची चलबिचल झाली असली तरी ती अगदी क्षणभर !

ती तरुणी आत बसताच कार पुढील प्रवासासाठी निघाली.


" इथे एवढ्या रात्री कसे काय ? " थोडं अंतर कापल्यावर प्रशांतने तिची माहिती काढण्यास आरंभ केला. 

" एकच्युली काय झालं.. मी इथं शहरात जॉबला आहे. काल संध्याकाळी आई आजारी असल्याचा मेसेज आला म्हणून तिला भेटायला मी गावी आले होते.. तिची भेट घेऊन घरातून निघायला उशीर झाला.. त्यात उद्या सोमवार असल्याने कामावर हजर होणं भाग होतं.. त्यामुळे उशीर झाला तरी निघण्याचा मी निर्णय घेतला. पण गाडी चुकली. तेव्हा अशीच लिफ्ट घेत घेत इथवर आले. "


' एका अनोळखी व्यक्तिला कोणी आपली अशी माहिती देत नाही. एकतर कमालीची मूर्ख, बडबडी असावी किंवा.. ' पुढची शंका मनात येण्यापूर्वीच त्या तरुणीने आपली बॅग उघडून त्यातील पार्सल खोलले आणि सँडविचचा वास गाडीत पसरला.

त्या वासाने न राहवून प्रशांतने तिच्याकडे पाहिले. तिने नाक आणि ओठ झाकणारा स्कार्फचा भाग खाली घेत सँडविच खाण्यास आरंभ केला होता. एक दोन बाईट्स ती घेते न् घेते तोच प्रशांत आपल्याकडे बघतोय पाहून ओशाळत्या स्वरात ती म्हणाली, " सॉरी हं ! काय झालं.. गडबडीत मी जेवणाचा डबा विसरले.. आणि आता इथे मी ही सँडविच पार्सल घेतली. तुम्ही घेणार का एक ? " 

प्रशांतने हो, ना करण्यापूर्वीच तिने बॅगेतून दुसरे पार्सल काढून उघडले. खरंतर काही खाण्याइतपत प्रशांतला भूक लागली नव्हती. परंतु त्यानिमित्ताने का होईना, या अनोळखी तरुणीसोबत संवाद वाढवून ओळख करून घेण्यासाठी त्याने तिच्या हातातील सँडविचचा एक पीस घेतला. 

" अजून एक.. " प्रशांतच्या तोंडातील घास संपण्यापूर्वी तिने दुसरा तुकडा त्याच्यासमोर धरला. तिला हातानेच थांबण्याची खूण करत त्याने कार थोडी साइडला घेतली.

साइडचा लिवर खेचत त्याने ड्रायव्हिंग सीट मागे घेतली. मागच्या सीटवर पडलेल्या दोन पाण्याच्या बाटल्या त्याने घेतल्या व त्यातली एक त्याने शेजारी बसलेल्या तरुणीच्या हाती देत दुसरी उघडून तोंडाला लावली. चार दोन घुटके घशाआड जाताच प्रशांतने तिच्या हातातील सँडविचचा पीस घेत तोंडात कोंबला व गाडी चालवण्यास आरंभ केला.

काहीशा शंकीत नजरेनं त्याच्याकडे बघत तिने हातातील पाण्याच्या बॉटलकडे एक नजर टाकत हाताने टोपण चापचले. बॉटल सीलपॅक होती. तेव्हा निःशंक होत तिने बाटली उघडून पाण्याचे एक दोन घोट घेतले खरे आणि… ..

.. प्रशांतला आपले डोळे जड वाटू लागले.. डोकं अगदीच सुन्न, बधिर वाटू लागलं.. हातपाय कमालीचे जडावले.. जबड्यावरीलही त्याचं नियंत्रण सुटू लागलं.. त्याही स्थितीत त्याने प्रयत्नपूर्वक गाडी बाजूला घेतली व शेजारच्या तरुणीकडे नजर टाकली तर… तिची मान खिडकीवर केव्हाच गळून पडली होती… ते पाहून प्रशांतने स्टेअरिंग व्हीलवर डोकं टेकवलं.


                                ( २ )


पहाटे पाचच्या सुमारास हायवे पेट्रोलिंगला गेलेली पोलिस जीप हायवेवरून परतत होती. नाईट शिफ्टच्या ड्युटीवर असलेल्या फौजदाराला झोप आवरत नव्हती. न राहवून त्याची नजर घड्याळाकडे जात होती. जे दाखवत होतं.. अजून दीड दोन तास अवकाश आहे, ड्युटी संपायला. 


गेल्या काही दिवसांत आसपासच्या जिल्ह्यांत हायवेवर लुटालुटीच्या घटना घडल्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुखांनी सर्व पोलिस स्टेशन्सला अलर्ट राहण्याचा हुकूम देत रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रत्येक पोलिस स्टेशनची एक टीम आपापल्या हद्दीत रात्री किमान दोनदा तरी हायवेवर पेट्रोलिंगसाठी बाहेर पडत होती. 


पीएसआय कांबळे अशाच एका टीमचा प्रमुख होता. त्याच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हायवे संपण्यास थोडसंच अंतर उरलं असता ड्रायव्हरला रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कार दिसली. त्याने गाडीचा वेग कमी करत कांबळेला ती गाडी दाखवत म्हटले, " सर, मघाशी आपण राउंडला गेलो तेव्हाही, ही गाडी इथेच उभी होती. " कांबळेंनी नुसतीच मान हलवली. इशारा समजून ड्रायव्हरने गाडी साइडला घेतली.


" भोसले, जरा जाऊन बघून या.. काय भानगड आहे ती..! " पाठीमागे बसलेल्या कॉन्स्टेबलला कांबळेनी ऑर्डर दिली. नव्यानेच सेवेत दाखल झालेला भोसले टुणकन उडी मारत गाडीतून खाली उतरला व कार जवळ गेला.


काचेतून आत डोकावून पाहिलं तर ड्रायव्हर स्टेअरिंग व्हीलवर डोकं ठेऊन झोपला होता. भोसलेनी काचेवर हाताच्या बोटांनी ' टकटक ' केली. ड्रायव्हरला हाका मारल्या, तरी प्रतिसाद मिळेना म्हणून त्याने दरवाजा उघडण्यासाठी हँडलला हात घातला. अपेक्षा तर नव्हती परंतु दरवाजा अनलॉक होता. 

दार उघडताच एक उग्र दर्प आला. शंकीत भोसल्याने ड्रायव्हरच्या खांद्याला हात लावताच स्टेअरिंग व्हीलवर ठेवलेली मान बाजूला कलंडली… ते अर्धवट तुटकं शीर बघून भोसल्याची जवळपास बोबडीच वळायची बाकी राहिली होती. कसाबसा स्वतःला व प्रेताला सावरून तो परत पोलिस जीपकडे आला व त्याने आपल्या सिनियरला पाहिल्या प्रकारची कल्पना दिली.


" भोसडीच्याला इथेच मरायचं होतं, ते पण माझ्याच ड्युटीला.." म्हणत कांबळे खाली उतरला.

कार व बॉडीची पाहणी करून त्याने पोलिस स्टेशन व वरिष्ठांना बातमी देत पुढील सोपस्काराची तयारी चालवली.


                              ( ३ )


रात्रीचे दोन वाजून गेले होते.निर्जन रस्त्यावर एक सुमो वेगाने चालली होती. आतमध्ये बसलेल्या चारही तरुणांच्या चेहऱ्यावरील चिंता, भीती साफ दिसत होती.


" परव्या.. अजून ही शुद्धीवर आलेली नाही.. औषध तरी किती टाकलं होतंस ? " मधल्या सीटवर झोपलेल्या तरुणीच्या शेजारी बसलेल्या अश्विनने काळजीच्या सुरात ड्रायव्हिंग करणाऱ्या प्रवीणला विचारलं. 

" किती म्हणजे.. ! भडव्या, गोळ्या तर तूच दिल्या होत्यास.. त्या सगळ्या टाकल्या.. पण या छिनालने.. कशाला खायच्या.. " चिडक्या स्वरात प्रवीण उद्गारला.

" परव्या.. तोंड सांभाळून बोल.. ती माझी.. " 

" हां, भोसडीच्या.. तुझी लव्हर आहे.. पण हिनं ते खायचं कशाला ? तिला माहिती नव्हतं का ! "

" अरे झाली चूक… हिला अशीच घेऊन आपण कुठे कुठे फिरणार ! त्यापेक्षा दवाखान्यात नेऊया.. "

" आणि डॉक्टरला काय सांगायचं ? आम्ही हिला झोपेच्या गोळ्या दिल्या म्हणून ! भोसडीच्या.. लवड्याने विचार करतोस का रे ? आपण चौघे, भर रात्र, आणि ही एकटी.. तिथल्या तिथे अटक होईल.. थोडा वेळ जाऊ दे.. "

" अश्विन.. तिच्या तोंडावर पाणी मार.. " पाठीमागे बसलेला रवी म्हणाला. 

" अरे अर्धी बाटली पाणी मारलं.. तरी डोळे उघडत नाहीए ही.. " रडवेल्या आवाजात अश्विन म्हणाला.


या तिघांचा संवाद ऐकत ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी अगदीच शांत बसलेला दिनेश अखेर उद्गारला, " उगाचच दंगा करू नका. प्रवीण, गाडी आपल्या जिल्ह्यातून बाहेर गेल्यावर जे प्रायव्हेट क्लिनिक दिसेल तिथे थांब. आपली जबाबदारी आहे, आपणच पार पाडली पाहिजे. आणि अश्विन… तू काळजी करू नकोस.. तिच्या तोंडावर पाणी शिंपाडतच राहा. प्रयत्नात कसूर नको. फक्त धीर धर. "


बोलता बोलता दिनेशने एक मेसेज टाईप केला व काही सेकंदात तो रवीच्या मोबाईलवर सेंड झाला. 

मेसेज टोनचा आवाज येताच रवीने मेसेज ओपन करून पाहिला व रीड करताच त्याचा चेहरा पडला.

थरथरत्या हातांनी त्याने मेसेज टाईप केला, ' काय.. गरज.. '

' सांगितलं तेवढं कर.. ' दिनेशचा रिप्लाय येताच रवीसमोर पर्याय उरला नाही. 


तसाही त्या चौघांमध्ये अत्यंत खतरनाक, डेअरिंगबाज म्हणून दिनेशचा लौकिक होता. त्याचा शब्द ओलांडण्याची प्रवीण सारख्या बलदंड व्यक्तीची देखील हिंमत नव्हती, मग फाटक्या शरीरयष्टीच्या रवीची काय कथा !

त्याने तोंडावर मास्क लावत सीटखाली ठेवलेल्या पिशवीतून एक छोटी पेटी उघडली. आत द्रावणात बुडवलेला ओलसर रुमाल हातात घेऊन त्याने एकवार समोर पाहिलं.. चिंतेनं काळवंडलेला अश्विन पाहून त्याच्या मनाची चलबिचल झाली खरी पण क्षणभरचं ! 

मन घट्ट करून त्याने झपाट्याने तो रुमाल अश्विनच्या नाकावर दाबला व त्याची धडपड बंद होईपर्यंत तसाच दाबून धरला.


                             ( ४ )


वरिष्ठ पोलिस अधिकारी बर्डेच्या देखरेखीखाली घटनास्थळाची कसून पाहणी चालली होती. कारमध्ये पाण्याच्या बाटल्या, एक कपड्यांची छोटी बॅग, जेवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य, टेंट, रिकामा आइस बॉक्स, दोन किचनमध्ये वापरात येणारे तर एक संरक्षणार्थ वापरला जाणारा चार इंची पात्याचा चाकू, सँडविचचे काही तुकडे, एक ओढणी, ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवर काही लांबसडक केस आढळून आले. खेरीज कारच्या मागेपुढे गाड्यांच्या टायरच्या काही खुणा आढळून आल्या, त्यांचेही प्रिंट्स गोळा करण्यात आले.


आसपास झालेल्या हायवेवरील लुटालुटीचा डेटा व प्रत्यक्ष घटनास्थळी सापडलेल्या वस्तू यांमुळे तपास अधिकारी नाही म्हटले तरी थोडे गोंधळात पडले होते. 

मृताची ओळख पटवण्यासारखे कागदपत्र गाडीत उपलब्ध नव्हते. पैशाचं पाकीट, मोबाईल जवळ आढळले नाहीत. कदाचित अंगावरील सोनंही गायब असेल. हायवेवरील इतर घटनांत लुटालुट करून, क्वचित मारहाण करून व्यक्तींना सोडण्यात आलं होतं. परंतु इथे तर प्रत्यक्ष खून करण्यात आला होता. खेरीज एक स्त्री देखील गायब होती. यावरून सदर प्रकरण अपहरण किंवा प्रेमप्रकरणातून केलेली हत्या व त्याला दिलेलं चोरीचं स्वरूप, या प्राथमिक निष्कर्षास बर्डे व सहकारी आले.


पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्यास तसेच गाडीत सापडलेल्या केस, पाणी, सँडविच इ. चे फॉरेन्सिक रिपोर्ट्स येण्यास बराच वेळ जाणार होता. तेवढ्या अवधीत नंबर प्लेटवरून मृताची ओळख पटवण्याचे निर्देश बर्डेंनी कांबळेला दिले. तसेच टोलनाक्यावरून ही गाडी केव्हा पास झाली याचीही माहिती घेण्याची सूचना केली. 


                                ( ५ )


मध्यरात्री तीनच्या सुमारास सुमो एका ठिकाणी थांबली. दिनेश व प्रवीणने आसपास नजर टाकली. मानवी वस्ती, हालचालीचे कसलेच लक्षण नव्हते. गाडी बंद करून दोघे खाली उतरले. पाठोपाठ मागील दरवाजा उघडून रवीही खाली आला. रस्त्यावरून थोडं खाली उतरून गेल्यावर एक विस्तीर्ण तळं त्यांना चांदण्यांच्या प्रकाशात दृष्टीस पडलं. काहीतरी मनाशी बेत ठरवून दिनेश त्या दोघांसह परत गाडीजवळ आला व त्याने अश्विनला बाहेर काढण्याची प्रवीणला सूचना केली. नंतर त्याने व रवीने मिळून प्रियाला बाहेर काढले. त्या दोघांना घेऊन ते तिघे तळ्याकाठी आले.


पुढे काय घडणार याची रवीला अंधुकशी कल्पना येऊ लागली होती. त्याचे अंतर्मन ढवळून निघाले… भीतीचा संचार झाल्याने त्याचे शरीर कंप पावत होते. त्याच्याकडे दुर्लक्ष करीत दिनेशने प्रवीणला, अश्विनच्या अंगावरील सर्व कपडे काढण्यास सांगितले.

" दि..दि..दिनेश.." कसंबसं बळ एकवटून रवी म्हणाला.

" हुं.." दिनेश उत्तरादाखल हुंकारला.

" खरंच याची गरज आहे का ? " 

" कशाची ? "

" यांना म..म्मारण्याची.." कसेबसे रवीच्या तोंडातून शब्द बाहेर फुटले.

ते ऐकताच दिनेश व प्रवीण मोठमोठ्याने हसू लागले.

" अरे.. यांना मारणार म्हणून तुला कोणी सांगितलं..! "

" मग अश्विनचे कपडे.. " शंकीत स्वरात रवीने विचारलं.

" अरे बाबा.. काही तासांनी दोघे येतील शुद्धीवर. फक्त यांची पीडा सोबत नको म्हणून यांना इथे फेकून जायचं आहे. … तू बघत काय उभा आहेस !  त्या प्रियाचे पण कपडे उतरव.. "

" पण कपडे कशाला.. " 

" अरे उतरव तरी.. माहित्येय आम्हांला.. तिला कसं चोरून चोरून बघतोस ते.. लाजू नकोस.. अश्विनला आम्ही नाही सांगत.. अरे त्याने तिला केली असेलच की.. आज तू कर.. फक्त कपडेच तर काढायचे आहेत.. हवं तर लग्नाची बायको समज न् हळुवार काढ.. काय ! " दिनेशच्या बोलण्याने रवी लाजला तर प्रवीण गालातल्या गालात हसला.


प्रिया हा तसा रवीचा वीक पॉईंट. ती त्याला आवडायची. पण अश्विनचे तिचे प्रेमसंबंध जुळल्याने रवीचा पत्ता कट झालेला. तरीही तिच्याविषयीची आसक्ती मात्र त्याच्या मनातून कमी झाली नव्हती. 

अनेकदा तो तिच्यासोबतच्या प्रणयाची स्वप्नं रंगवायचा… आणि आज दिनेशने तिला विवस्त्र करण्याचा हुकूम सोडून एकप्रकारे त्याच्या सुप्त वासनेला चेतवले होते. 


बघता बघता रवीने प्रियाला विवस्त्र केलं. अश्विन व प्रियाच्या अंगावरील कपड्यांची बोचकी घेऊन प्रवीण एका बाजूला उभा राहिला. 

प्रियाच्या विवस्त्र देहाकडे रवी आसुसलेल्या नजरेनं बघत होता. काही वेळापूर्वी त्याच्या मनात, शरीरात संचारलेली भीती दूर होऊन त्याची जागा आता वासनेनं घेतली होती. 

दिनेशने रवीच्या मनातील भाव अचूक ओळखला. 

" काय रव्या.. मग करणार का ? "

" काय ? " न समजून, गोंधळून रवी उद्गारला.

" भोसडीच्या.. बायल्यासारखं काय म्हणून विचारतोयस.. किती वेळा तिला कल्पनेत न् नजरेनं झवणार.. मौका आहे.. चढ इथेच.. अश्विनच्या बापालाच काय पण प्रियालाही कळणार नाही. "

" पण.. "

" अरे, पण बिन सोड.. तुला जमत असेल तर कर, नाहीतर मग उद्घाटन आम्हीच करू.. बोल.. "

तरीही रवी पुढे पाऊल टाकण्यास धजवेना. तेव्हा आपल्या पॅन्टच्या चेनला हात घालत दिनेश म्हणाला, " परव्या.. प्रियाने या हांडग्याची अचूक पारख केली बघ.. तिला माहिती होतं याच्यात काही जोर नाही. म्हणून तिने अश्विनचा हात धरला. " ही मात्रा बरोबर लागू पडली. डिवचलेला रवी एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे विवस्त्र प्रियाच्या देहावर झेपावला. बेशुध्दवस्थेतील प्रियाचे शरीर, स्वतःच्या तनमनाची आग शांत होईपर्यंत भोगत राहिला. अधूनमधून मोबाईल टॉर्चच्या उजेडात दिनेश, प्रवीण त्याला प्रियाच्या चेहऱ्याचे.. देहाचे दर्शन घडवत, त्यावर कॉमेंट पास करत होते. जेणेकरून रवीची उत्तेजना आणखी वाढत होती.

रवीचा कार्यक्रम होताच लागलीच दिनेश व नंतर प्रवीणने आपला कार्यभाग उरकून घेतला. त्यानंतर थोडावेळ ते तिथेच बसले.


दिनेशने मोबाईलमध्ये टाइम पाहिलं तर चार साडेचार वाजत आलेले. आता फार वेळ थांबण्यात अर्थ नव्हता. त्याने प्रियाचा देह ओढत ओढत तळ्याच्या काठावर नेला. प्रवीणनेही अश्विनला तिथे फरफटत आणले. व दोघांनी एकेक मोठा दगड उचलत त्या दोघांच्या चेहऱ्यावर जोरात आपटले. दोन तीन प्रहरातच दोघांच्या कवट्या फुटून गेल्या.


या भीषण दृश्याला पाहून रवीची तर दातखिळीच बसली. अंगातील सर्व बळ खचल्यागत तो जागीच मटकन बसला. तोवर प्रवीण आणि दिनेशने त्या दोघांची प्रेतं सोबत ओढत तळ्यात नेली व जितकी आत नेऊन सोडता येतील तेवढी सोडली. नंतर पाण्याबरोबर येऊन त्यांनी गुन्ह्यात वापरलेले दगडही पाण्यात फेकले व अंगावर कपडे चढवले.


" रव्या उठ..पट्कन गाडीत बस.. " शर्टाची बटणं लावता लावता दिनेश म्हणाला. रवीच्या कानांवर त्याचे शब्दच जणू गेले नाहीत. मख्खासारखा तो बसून राहिला. 

" रव्या.. फोद्रीच्या उठ न् गाडीत जाऊन बस. इथेच बसलास तर भोसडीच्या, तुझ्यासह आमच्याही गळ्याला फास लागेल.."जड अंतःकरण व पावलांनी रवी गाडीत जाऊन बसला. पाठोपाठ प्रवीण आणि दिनेशही गाडीत आले व सुमो भरधाव वेगाने अंधारात रस्ता कापत निघून गेली.

                                                    ( क्रमशः ) 

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

' जय भीम ' चित्रपटाच्या निमित्ताने


वंचित घटकांवरील अन्याय, अत्याचार, शोषण आपणास नवीन नाही. या एका बाबतीत देशातील सर्व राज्यं आघाडीवर आहेत  म्हटलं तरी चालेल. ' जय भीम ' ही अशाच एका वंचितावरील अन्यायाची कहाणी.

 तामीळनाडूत स. १९९३ पासून स. २००६ पर्यंत घडलेली एक सत्य घटना. ज्यामध्ये चोरीच्या आरोपावरून राजकन्नू या निरपराध व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. लॉकअपमध्ये गुन्हा कबुलीकरता त्याचा छळ केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कस्टडीत झालेल्या मृत्यू लपवण्याची पोलिसांनी केलेली धडपड व मृत राजकन्नूची पत्नी -- सेंगईचा न्यायासाठी चाललेला अविरत संघर्ष पडद्यावर मांडताना काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार घेण्यात आला आहे. उदा. उपलब्ध माहितीनुसार घटना स. १९९३ मध्ये घडते तर चित्रपटाचा आरंभच मुळी स. १९९५ मध्ये होतो. खेरीज हेबियस कॉर्पस द्वारे दाखल केलेल्या पिटिशन मध्येच केस निकाली निघाल्याचे इथे दाखलं असलं तरी प्रत्यक्षात असं नसतं.
 हेबियस कॉर्पस हा अटक केलेल्या व्यक्तीला कोर्टासमोर सादर  करण्यासाठीच्या प्रोसिजरचा एक पर्याय आहे. असो.

 चित्रपटाची कथा उघड असल्याने यासंबंधी लिहिण्यासारखे काही नाही. मात्र या अनुषंगाने ऐरणीवर येणारा प्रश्न म्हणजे पोलिसांकडून होणारा अधिकारांचा गैरवापर, समाजातील वंचितांचे स्थान व वाढत जाणारी सामाजिक विषमता. याबाबतीत देशातील कोणतेही राज्य दुसऱ्यापासून कमी नाही.

 माझ्या पिढीने खैरलांजीपासून आता अलीकडे घडलेल्या ( खरं म्हणजे उजेडात आलेल्या ) सांगलीच्या अनिकेत, भायखळ्याची मंजुळा शेट्ये प्रकरणांची चर्चा पाहिलीय. त्यात दोष सिद्धी झाली न् झाली या बाबी कधीच पुढे आल्या नाहीत.नगरच्या नितीन आगे प्रकरणात तर अन्यायाची परिसीमा झाली.
 ही तशी दखलपात्र उदाहरणं. अप्रसिद्ध अशी कितीतरी. पोलीस न्याय संस्थेत जर तुमचे आप्त स्नेही असतील तर असे कित्येक राजकन्नू, सेंगई तुम्हाला माहिती पडतील. एफआयआर नाही, केस नाही पण व्यक्ती तुरुंगात आहे. जामीनपात्र असुनही जामीन दिला जात नाही.

 सदोष पोलीस - न्याय यंत्रणेबाबत लिहावं तेवढं थोडंच. बदल सर्वांनाच हवाय पण मानसिकता नाही. मुळात आपल्यात सामाजिक ऐक्य, एकोपाच नाही.

 स्वतःवरील अन्यायाविरुद्ध कोणीही पेटून उठेल.  धर्म - वांशिकतेचा मुद्दा मांडला तर सामूहिक अन्यायाविरुद्ध समुदाय उभा राहतो. परंतु परिचित - अपरिचित, निर्दोष व्यक्तीवरील अन्यायाविरुद्ध लढण्यास कोण उभा राहतो ? हा प्रश्न प्रत्येक विचारी व्यक्तीने स्वतःला विचारलं पाहिजे.

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

अहिंसक सत्याग्रहाने देशाला स्वातंत्र्य मिळाले काय ?



मनुष्य हा इतर प्राण्यांप्रमाणेच निसर्गतः हिंस्त्र स्वभावाचा आहे. ही गोष्ट लक्षात घेता शांततामय नागरी जीवनाकरता मर्यादित अहिंसा आवश्यक ठरते, हे प्रथमतः लक्षात घेतले पाहिजे.

अहिंसक मार्गापेक्षा हिंसक मार्गाने या देशाला स्वातंत्र्य अल्पावधीत मिळाले असते हे खरंय. परंतु त्यानंतर काय ? सत्ता कोणाची व कशाप्रकारची ? या मूलभूत प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं आहे. उदा :- स. १८५७ चा उठाव या मुख्य प्रश्नांमुळेच फसला होता व द्विराष्ट्रवाद तेव्हाच जन्मला होता, हे ऐतिहासिक सत्य आहे. आणि या द्विराष्ट्रावादाच्या उभारणीचे पुण्य वैदिक पेशवाईकडे जाते, हे देखील आपणांस नाकबूल करता येत नाही. असो.

स. १८५७ चा अनुभव डोळ्यांसमोर असल्याने निःशस्त्र लढा स्वीकारण्यात आला, तो दुहेरी उद्देशांनी. प्रथम, स्वातंत्र्यप्राप्तीस अनुकूल समाजमन बनवणे व द्वितीय, प्रत्यक्ष स्वातंत्र्य प्राप्ती ! 
लोकांना स्वातंत्र्य, ऐक्य, एकता, एकात्मता यांची जाणीव करून देणे. जी स. १८५७ किंवा त्यानंतरही सामान्य जणांस व्यापक प्रमाणात करून देण्यास सशस्त्र मार्गाचे नेतृत्व कमी पडलं. 
टिळकांना जहाल राजकारणी मानतात, परंतु त्यांचे जहाल राजकारण तरी निःशस्त्र लढ्यापुढे जात होतं का ?

अहिंसक लढा उभारून गांधींनी भारतीय जनतेला शिस्तबद्ध आंदोलनाची दीक्षा दिली. आजही स्वतंत्र भारतात आंदोलनं होतात ती याच मार्गाने. हा परिणाम निव्वळ सशस्त्र क्रांतीने घडून आला असता का ? 

नेपोलियन फ्रांस तर स्टॅलिन रशियन राज्यक्रांतीचे अपत्य होते. मात्र हिटलर कोणत्या क्रांतीतून जन्माला आला ? त्याने सत्ता कोणत्या मार्गाने काबीज केली, हे आपणांस विसरता येईल का ? सशस्त्र लढ्यातून जन्माला आलेला झिम्बाब्वे आज कुठे आहे ? 

क्रांतिकारकांची भूमिका, त्यागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा आमचा हेतू नाही. आम्हांला सशस्त्र व निःशस्त्र, या दोन्ही मार्गांनी देशस्वातंत्र्याकरता हौतात्म्य पत्करलेल्या व्यक्तींविषयी नितांत आदर, अभिमान व कृतज्ञता आहे. परंतु एका पक्षाची कड घेऊन दुसऱ्या पक्षीयांचा जाणीवपूर्वक उपमर्द करणं.. पर्यायाने या दोन्ही गटांतील देशभक्तांची, त्यांच्या त्याग - बलिदानाची टर उडवणाऱ्या स्वातंत्र्यद्वेष्ट्या विचारसरणीचा समाचार घेण्याचा, त्यांचं पितळ उघडं पाडण्याचा आमचा हेतू आहे.


बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

प्रासंगिक ( १० )



' वर्गविहीन समाज ' संकल्पना कितीही आरदर्शवत् असली तरी प्रत्यक्षात येणे शक्य नाही. निदान जोवर समाजाला शासन यंत्रणेची आवश्यकता आहे, तोवर तरी !

वर्गव्यवस्थेची अनेक रुपं असली तरी त्यातील ' जात ' ही वर्ग पद्धती अत्यंत विघातक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जाती अपरिवर्तनीय मानल्या जातात व जातीचे सदस्यत्व जन्मतः प्राप्त होते. थोडक्यात धर्म ऐच्छिक आहे तर जात अनैच्छिक.

तटस्थपणे जातीसंस्थेचा इतिहास पाहिला तर तिचा उगम श्रेणी संस्थेत आढळून येतो. ही श्रेणीसंस्था व्यावसायिकांची असून तिचे सदस्यत्व जन्मावर आधारित नव्हते.

कालौघात श्रेणीसंस्थेचे जातीसंस्थेत रूपांतर झाले व ती अपरिवर्तनीय मानण्यात येऊ लागली.

' जात ' ही वर्गरचना असल्याने यात उतरंड असणे स्वाभाविक आहे. जर हे सामाजिक स्थितीवर असते तर तिची दाहकता, विखार कोणाला जाणवला नसता. परंतु त्यांस अनुवंशिकत्व चिकटल्याने हा प्रकार अत्यंत जटिल बनला व प्रामुख्याने हिंदू समाजाची अपरिमित हानी झाली.

जातिसंस्था निर्मूलनाचे अनेक सामाजिक - कायदेशीर प्रयत्न झाले. परंतु ती खिळखिळी करण्यापलीकडे फारसे यश लाभलेलं नाही. 

' जात ' या संज्ञेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मुळातच निकोप नाही. स्पष्ट सांगायचं झाल्यास जाती निर्मूलन झाले पाहिजे म्हणणारेच जातिसंस्था बळकटीकरता प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. 
उदा :- गेल्या दहा पंधरा वर्षांत प्रत्येक जातीसमूहाने आपापल्या समाजातील दैवताच्या, होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या नावाने अभिवादनाचा प्रघात स्वीकारला आहे. यातून नेमकं काय साध्य होते ? 

आपापल्या जातीत होऊन गेलेल्या व्यक्ती विषयी कृतज्ञता दर्शवणे, देवतेचे नामसमरण करणे वगैरे भ्रामक युक्तिवाद या समर्थनार्थ केले जातात. परंतु अप्रत्यक्षरीत्या यातून प्रत्येक जात आपली स्वतंत्र ओळख जपण्यास आत्यंतिक प्रयत्नशील तथा आग्रही बनत जाते त्याचं काय ?
यातून जातीसंस्थेच्या बळकटीकरणास अप्रत्यक्षरीत्या हातभार लागून, ही जातिसंस्था समूळ नष्ट करण्यासाठी आपली उभी हयात वेचलेल्यांची एकप्रकारे विटंबना ठरत नाही का ? हा त्यांच्या कार्याचा अवमानच आहे. 

अज्ञ जणांना या गोष्टी समजायच्या तेव्हा समजतील परंतु स्वतःस सुज्ञ म्हणवणाऱ्यांनी तरी याबाबतीत विचार करणे आवश्यक आहे.