सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

मनुस्मृति दहन स्मृतिदिनानिमित्त चार शब्द ...




    डिसेंबर अखेर जवळ आला कि तथाकथित संस्कृतीरक्षकांचे नाताळविरोधी व आंबेडकर अनुयायांचे मनुस्मृति दहन संबंधी मेसेज हातात हात घालून सोशल मिडीयावर फिरताना दिसतात. बेगडी संस्कृतीरक्षकांच्या संबंधी या स्थळी लिहिण्याचा हेतू नाही परंतु मनुस्मृति संबंधी चार शब्द लिहिणे आवश्यक वाटते.

    डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतिचे अभ्यासपूर्वक वाचन करून तिचे दहन केले. त्याप्रसंगी मनुस्मृति हा हिंदू धर्मियांचा स्मृतिग्रंथ असल्याची त्यांची इतरांप्रमाणेच धारणा होती. परंतु अलीकडच्या अभ्यासावरून व खुद्द वैदिक साहित्य तसेच डॉ. आंबेडकरांच्याच भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म तसेच शुद्र कोण होते ? या ग्रंथांवरून सिद्ध होते कि, मनुस्मृति हा हिंदुंचा ग्रंथ नसून वैदिक धर्मियांचा स्मृतिग्रंथ आहे.

    यातील वर्णविभागणी व शूद्रासंबंधीचे नियम हे हिंदूंना कधीच लागू नव्हते. तसेच वैदिक धर्मियांनी हे नियम हिंदुंवर कधी लादले देखील नाहीत. कारण असे करण्यासाठी त्या त्या धर्माची राजसत्ता येथे प्रस्थापित होणे आवश्यक असते व वैदिकांची एक पेशवाई अपवाद केल्यास येथे कोणतीच राजसत्ता स्थापित झालेली नाही. व पेशवाईतही होळकरासारखे सरदार स्वतंत्र संस्थाने स्थापून राज्यकर्त्याप्रमाणे राहत होते.
    जर मनुस्मृति हि हिंदूंची असती तर होळकराला सरदारकी प्राप्त झाली असती का ? किंवा तत्पूर्वीचे प्राचीन, मध्ययुगीन दाखले पाहिले तर सातवाहन, नंद कोण होते ? नंदाची अखेर करणारा चंद्रगुप्त मौर्य कोण होता ?

    वैदिक ग्रंथात आढळणारा ब्राह्मण शब्द व ऐतिहासिक साधनांत आढळणारे ब्राह्मण दान, देणगी, अग्रहार सारखे उल्लेख, यावरून आम्ही येथे वैदिक धर्मीयांची राजसत्ता प्रस्थापित असल्याचा समज करून घेतो व असा समज करून देण्यात वैदिक इतिहासकारांनी आपल्यावतीने यत्किंचितही हलगर्जीपणा केलेला नाही. जिथे जिथे त्यांना दानपत्रात किंवा इतरत्र ब्राह्मण शब्द आढळला तिथे तिथे त्यांनी त्या राजवटीला वैदिक राजसत्तेचे लेबल चिटकवले.

    शिवाजीच्या बिरुदावलीत गोब्राह्मण प्रतिपालक चिटकवण्यामागे त्यांचा मुख्य हेतू हाच होता. जो प्रामुख्याने ब्रिगेडने कधी नाही ते शहाणपणा दाखवत उधळून लावला. परंतु वैदिक क्षत्रियत्वाच्या गारुडातून मात्र ते सुटू शकले नाहीत व गोब्राह्मणप्रतिपालक हटवून क्षत्रियत्वाचे जोखड त्यांनी आपल्या गळ्यात स्वखुशीने अडकवून घेण्याचा जोरदार प्रयत्न चालवलाय. ज्याला खुद्द वैदिकांचाच प्रखर विरोध आहे.

    मनुस्मृति वर्णव्यवस्थेचे समर्थन करते म्हणून तिचे दहन आवश्यक आहे तर प्राचीन काळापासून ते आजतागायत या स्मृतीनुसार देशात समाजरचना अस्तित्वात होती हे निर्विवादपणे सिद्ध करणारा एकतरी पुरावा उपलब्ध आहे का ?

    मनुस्मृतीत शुद्रविरोधी वचनं आहेत म्हणून तिचे दहन करावे तर प्रथम हे शुद्र कोण आहेत याचा विचार होणे आवश्यक आहे. या स्मृतिच्या अभ्यासावरून वैदिकांनी शूद्रांचे दोन वर्ग कल्पिल्याचे स्पष्ट होते. प्रथमतः जे वैदिक नाही त्यांना ते शुद्र म्हणत. त्यानंतर वैदिक धर्मात प्रवेशलेले तसेच वैदिकांच्या सेवेत असलेले ते शुद्र अशी त्यांनी शुद्रत्वाची व्याख्या बनवली. आणि स्मृतिग्रंथातील शुद्र संबंधी कटू वचने या दुसऱ्या वर्गातील शूद्रांना उद्देशून आहेत.
    मग जर स्मृतिवचनं वैदिक शूद्रांकरता आहेत तर गैर वैदिकांनी रडायची गरज तरी काय ? तसं बघायला गेलं तर कुराणातही गैर इस्लामी तथा काफिर विरोधी वचनं आहेत. मग त्याची होळी कोण करतं का ?

    डॉ. आंबेडकरांची धर्मांतर घोषणा व त्यानंतर तसेच तत्पूर्वीही झालेले जात्युछेदनाचे हास्यास्पद प्रयोग हा देखील विचारात घेण्यासारखा विषय आहे.

    अशा प्रयोगात सहभोजन, जानवं देणे वगैरे प्रकार होत. यांपैकी जानवं देण्याच्या निमिताने काही वैदिकांनी धर्मान्तराची छुपी मोहीही चालवली होती ज्यामध्ये हिंदुत्वाचा बुरखा घेतलेले सावरकरांसाखे कट्टे वैदिक धर्मीयही सहभागी होते. परंतु खुद्द स्वधार्मियांनीच त्यांना याबाबतीत साथ न दिल्याने, त्यांच्या धर्मान्तरास मान्यता न दिल्याने हिंदूंनी अस्पृश्य मानलेल्यांना वैदिक धर्मात घेण्याचा त्यांचा डाव फसला.

    डॉ. आंबेडकर देखील उपनयन, वेदांचे शिक्षण इ. वैदिक संस्कारांचे महत्व मानत होते. कारण त्या काळात वैदिक हे हिंदू धर्मातीलच एक घटक किंबहुना हिंदूच होत अशी भावना प्रबळ होती व तसा समजही करून देण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात उपनयन करवून घेणे किंवा वेद शिकणे म्हणजे सुंता करवून कुराण पठण करण्यासारखे आहे, हि वस्तुस्थिती आंबेडकरांच्या लक्षात त्याकाळी येऊ शकली नाही तरी सद्यकालीन त्यांच्या अनुयायांना व हिंदूंना न यावी  हि मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

    कोण कुठल्या अफगाण प्रांतात जन्मलेला वैदिक धर्म. ज्याची मुळे पारशी धर्मात आढळतात व त्या धर्मियांनी मांडलेल्या उच्छेदामुळेच वैदिकांना देशांतराचा निर्णय घ्यावा लागला. आपली जन्मभूमी, भाषा यांना ते कायमचे अंतरले. परंतु आपला धर्म, संस्कार, श्रद्धा वगैरेंना जपण्याचा त्यांनी येथे आटोकाट प्रयत्न केला. आपलं अल्पसंख्यकत्व कमजोरी ठरू नये म्हणून केवळ भाषिक साधर्म्याधारे ब्राह्मण शब्दाचा आधार घेत हिंदू धर्मात शिरकाव केला. येथील साहित्य, संकृतीचे वैदिकीकरण करून त्यांनी कागदोपत्री स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व आजही करताहेत.
 
    डोळस वृत्तीने, स्वतंत्र बुद्धीने त्यांचे हे डाव ओळखून हाणून पाडणे आपले कर्तव्य आहे. सुदैवाने त्यांच्यातील काहींनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस जागून केंद्र सरकारकडे धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्यांस पाठबळ देऊन यांना सन्मानाने हिंदू धर्मातून बाहेर काढणे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्याखेरीज हिंदू धर्मीयांची व हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांची स्थिती सुधारणे शक्य नाही ! 

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

शारीरिक संबंध :- मुक्त चिंतन



    शारीरिक संबंधांविषयी उघड चर्चा वा लेखन करायचं नाही असा एक आपल्यात दंडक आहे. वास्तविक ज्या समाजाने कामशास्त्रास जन्म दिला, ज्या समाजाची पूजन व्यवस्था लैंगिक संबंधांचीच प्रतीकात्मकता आहे त्या समाजाची हि दुटप्पी मानसिकता विस्मयजनकच म्हणावी !

    या कुचंबलेल्या मानसिकतेचा परिणाम समाजाच्या शाब्दिक पारिभाषिकतेवरही झाल्याचे दिसून येते. शरीरसानाब्न्ध हा लांबलचक शब्द सहसा उच्चारला जात नाही. लैंगिक संबंध देखील तसाच. त्यातल्यात्यात देशी short फॉर्म म्हणजे संभोग ! अर्थात, हा सभ्य सामाजिक शब्द. पण त्याचाही उच्चार सभ्य लोकांकडून होत नाही. यंग जनरेशनच्या दृष्टीने उपरोक्त शब्द म्हणजे आउटडेटेड संकल्पना, अडगळ. त्यांनी सेक्स शब्दाचा आधार घेतलाय. बाकी ह, झ, ल वगैरे पासून सुरु होणारे, सहजगत्या उच्चारले जाणारे --- विशेषतः शिव्यांमध्ये --- शब्द ग्राम्य मानले जातात.

    प्राचीन काळी अनिर्बंध लैंगिक संबंध होते. ज्यावर नियंत्रण ठेवत क्रमाक्रमाने त्या संबंधांना विवाहसंस्थेत गोवत संभोगाचा संकोच करण्यासाठी मातृत्व - पितृत्व या उदात्त, पवित्र वगैरे संकल्पनांची निर्मिती करण्यात आली. जी पूर्णतः अनैसर्गिक आहे.

    भारतीय समाजमनावर हिंदुत्वाचा बुरखा घेतलेल्या वैदिक धर्मियांचा मोठा पगडा आहे. ज्या धर्मात संभोगास अतिशय नगण्य, तुच्छ स्थान देण्यात आले आहे. ज्याचा उल्लेख तिरस्कारपूर्वक केला जातो. कदाचित यामुळेच शरीरसंबंधांविषयी उघड चर्चा न करण्याचा दंडक निर्माण झाला असावा. परंतु इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे हे वैदिक धर्मीय आरंभी संभोगाच्या बाबतीत अनिर्बंध, स्वैर संबंधांचेच पुरस्कर्ते होते.

    संभोगाविषयी भारतीयांच्या मनी एक जबरदस्त आकर्षण आहे व ते स्वाभाविकही आहे. धार्मिक प्रवचन, सत्संग सारख्या भिकारचोट कार्यक्रमांतून भगवी, पांढरी वस्त्रं घातलेली / न घातलेली वळू मंडळी मानवी संभोगाची नेहमी पशुत्वाशी तुलना करत या बाबतीत पशु देखील प्रजननार्थ जवळ येत असल्याचे सांगत मनुष्याने केवळ मातृ - पितृत्व प्राप्तीकरता संभोग करावा असे वारंवार सूचित करत असतात. जे यांच्या तडाख्यात येत नाहीत त्यांची पुस्तकांतून शिकार केली जाते. सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने अशा मेसेजचा सकाळ - संध्याकाळ अक्षरशः वर्षाव केला जतो.
    
    वास्तविक निसर्गाने संभोगाचा अधिकार हा प्रत्येक प्राण्यास दिलेला आहे व इच्छेनुरूप त्यास तो योग्य मार्गाने प्राप्त होणे आवश्यक आहे.

    मनुष्य वगळता इतर प्राण्यांची भाषा अगम्य असल्याने त्यांचे यासंदर्भातील विचार समजणे शक्य नाही. परंतु मनुष्यांपुरता विचार केला तर सभ्यतेच्या, प्रगतीच्या नावाखाली आपण मनुष्यजीवनातून संभोगाचेच उच्चाटन करत चाललो आहोत.

    प्रथमतः संभोगासाठी वयाची विशिष्ट अट लागू केली जाते. त्या वयात पोहोचताच तुम्हांला संभोगाचा अधिकार प्राप्त होतो पण करता येत नाही. कारण त्याकरता समाजानेच लग्नाची अट घातली आहे. या अटीच्या पूर्ततेसाठी अर्थार्जन आवश्यक आहे. अर्थात, त्यासाठी धावपळ हि आलीच. खेरीज लग्नासंबंधी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना, अपेक्षा असल्याने त्यांच्या पूर्ततेसाठी आणखी काही काळ थांबणे भाग पडते. त्यानंतर लग्न कधी होईल तेव्हा होईल. लगेच समाजाने एकप्रकारे लादलेल्या मातृ - पितृत्वाच्या प्राप्तीसाठी धडपड. त्यानंतर अपत्याचे संगोपन, शिक्षण आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी आर्थिक तरतूद करणे. यातून मनुष्याला स्वतंत्र खासगी जीवनासाठी वेळ मिळतोच कुठे, आणि त्याला जीवनातील अत्युच्च संभोगानंदाची प्राप्ती होते तरी केव्हा ?

    याचा परिणाम म्हणजे समाजानेच ठरवलेल्या लैंगिक संबंध विषयक गुन्ह्यांत वाढ. वस्तुतः व्यक्तीचा संभोग अधिकार एका हाताने हिरावून घेत वर तिने चोरून प्राप्त केलेल्या शरीरसुखास्तव तिला अपराधी मानणे हि एकप्रकारे मनुष्यत्वाचीच क्रूर थट्टा आहे व ती आजच नव्हे तर शेकडो वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. परंतु प्राचीन काळी अशी स्थिती होती का ?  

    महाभारतावरील वैदिक धर्मियांनी केलेले संस्कार दूर करत निखळ हिंदू दृष्टीने पाहिले तर तत्कालीन समाज हा लैंगिक बाबतीत स्वातंत्र्यप्रिय दिसतो. तिथे व्यक्तीचा संभोगाधिकार हा समाजानेच मान्य केलेला आहे. त्यामुळेच कुंती, द्रौपदी, हिडींबा, सत्यवती सारखी उदाहरणे तिथे आढळतात. रामायण पाहिले तर शूर्पणखाही याच समाजव्यवस्थेतील असल्याचे दिसून येते. रावण वधानंतरचे रामायण प्रक्षिप्त मानले जाते परंतु रामाने सीतेच्या त्यागाची भाषा उच्चारत तिला लक्ष्मणाकडे जायला सांगण्यातून काय ध्वनित होते ? 
    बरं, या पुरातन गोष्टी झाल्या. खजुराहो सारखी अमर शिल्पं आपल्याला काय सांगतात ? किंवा सध्या प्रचलित असलेल्या पूजा पद्धती तरी काय सांगतात ? कामाख्या देवीच्या मंदिरात प्रसादादाखल मिळणारा लाल कपड्याचा तुकडा कशाचे प्रतीक आहे ?
    स्त्रीच्या मासिक पाळीकडे विटाळ, अपवित्र दृष्टीने बघणारा समाज देवीच्या विटाळाचे प्रतीक म्हणून मिळणारा कापडी तुकडा प्रसाद म्हणून मिरवतो हा निश्चितच विरोधाभास आहे.
 
    मंदिरांमध्ये देवी - देवतांची लग्नं लावली जातात. लग्नानंतर त्यांच्याही रात्री सजवल्या जातात. म्हणजेच संभोगाचे प्राचीन काळी असलेले स्थान अवनत होत कोणत्या स्थितीपर्यंत आलेलं आहे व पुढे कुठवर जाणार आहे याची कल्पना करणे तितकेसे अवघड नाही.