शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

फुल्ली फालतू ! ( भाग - २ )



    खूप वर्षांमागे म्हणजे आजसे पंधरा बीस वर्ष पैले धरमिंदर और जयाप्रदा का एक शिनेमा आया था. जिसका मराठी पेपर में परीक्षण आया उसका टायटल ' म्हातारा वाघ अन् म्हातारी वाघीण ' ऐसा कुच था.


    याच आसपासच्या काळात धरम और हेमाजीकी लव्ह इष्टोरी पर मराठी पेपर या मासिक में आर्टिकल आया जिसमें यंग धरम के सामने आशा, शर्मिला, मुमताज कशा म्हाताऱ्या दिसू लागल्या होत्या व धरमचे मर्दानी सौंदर्य ( हे काय असतं ते त्या पत्रकाराच्या जीवाला ठाऊक ) खुलवण्यासाठी तरुण नटीची गरज होती अशी मांडणी करत हेमामालिनीची सिनेमातली व धरमच्या जीवनातली एन्ट्री सांगत ती कथा त्यांच्या लग्नापर्यंत नेऊन समाप्त केली होती.


    आता धर्मेंद्रचं वय किंवा त्याची जन्मतारीख जर बघितली तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या नट्या ( आधीच्या काळातल्या ) कोणत्या अँगलने म्हाताऱ्या वाटत होत्या, हे त्या समीक्षकालाच माहिती. गंमतीचा भाग म्हणजे धरमजीकी हिरॉइन बनी तनुजा पुढे सिनियर सिटीजन तथा चरित्र भूमिकांत गेली तरी धरम बीस - पच्चीस या तीस साल का ही रहकर कभी जयाप्रदा तो कभी अमृता सिंग या अनिता राज के साथ उछलकूद करता रहा. ( आता धर्मेंद्रच्या नाचाला माकडचाळे तर म्हणू शकत नाही. कारण त्यात एक नैसर्गिक ओरिजिनॅलिटी आहे व दुसरं असं कि माकडचाळे फक्त आणि फक्त राजिंदरनाथचं करू शकतो, हे माझं ठाम मत आहे. )


    तसं बघायला गेलं तर हिरो कधीच म्हातारा होत नाही. निदान आपल्याकडे तरी. फिल्म ' नरम गरम ' मध्ये परमपूज्य ओमप्रकशजींनी हो गोष्ट पुरुष संकल्पनेला हिरा व अंगठीची जोड देत चांगलीच एक्स्प्लेन केलीय. आता त्यात स्वरूप संपत पेक्षा अमोल पालेकर वयस्कर दिसतो हि गोष्ट वेगळी तर सांगायचा मुद्दा असा कि, आपल्याकडे हिरो कधीच म्हातारा होत नाही. म्हणूनच जम्पिंग जॅक जितेंद्र राजश्री टू माधुरी दीक्षित पर्यंतच्या पिढीचा नायक बनू शकला. मिथुनदाने तर ज्ञात पेक्षा अज्ञात, उदयोन्मुख व विस्मृतीत ( बहुधा एक दोन सिनेमांतच ) गेलेल्या नट्यांसोबत आपली अखेरची व प्रदीर्घ फ्लॉप इनिंग खेळली. ( बहुधा मिथुन व देव आनंदमध्ये याबाबतीत छुपी कॉम्पिटिशन सुरु असावी. देव गेला न् मिथुनही रिटायर झाला. फिल्म इंडस्ट्रीत येऊ इच्छिणाऱ्या मुलींचा मोठाच आधार गेला ! ) नीलम ते हंसिका मोटवानी असा गोविंदाचाही प्रवास झाला. धरमपाजी तर आता आलिया भटचाही हिरो म्हणून काम करायला तयार असेल व फिल्मी हितसंबंध म्हणून आलियाही या गोष्टीस रोमँटिक वगैरे कल्पना म्हणत आपली सहमती दर्शविल. पण आत्ताचे प्रेक्षक व चित्रपट निर्माते सुजाण झालेत. किंवा असंही म्हणता येईल कि, हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांच्या दुदैवाचे दशावतार संपलेत. नाहीतर आजी जयाप्रदाच्या सुनेचा --- इथे माधुरी ते ऐश्वर्या कोणीही चालेल --- मुलगा धरम तथा वीरू, वीरसिंग वगैरे. धर्मेंद्रला नंतरच्या काळात हीच नावं मिळायची. मला एक समजत नाही. ८० नंतरचे धर्मेंद्रचे फिल्मी आईबाप आपल्या मुलाचे नाव वीरूच का ठेवायचे ? दुसरं काही ठेवता येत नव्हतं कि सिनेमात पाच मिनिटांपेक्षा जास्त वावर नसल्याने जगाचा त्यांना अनुभव मिळत नसावा ? सोचने वाली बात है.


    तर माधुरी वा ऐश्वर्या सम आईचा ऐन ज्वानीत आलेला वीरसिंग / वीरू आपली छुईमुई सोलह सालकी गर्लफ्रेंड .. सॉरी प्रेमिका आलिया भटसे मिळणे बाग में जा रहा है. ( भारतीय कायदा अठराचं अठ्ठावीस करेल पण हिंदी सिनेमा सोलह सालातच अडून राहील. बहुधा सोळा नंतर मुळी थोराड होत असाव्यात असा त्यांचा समज असावा. ) धरमची लहान / मोठी बहिण म्हणून कदाचित सोनाक्षी फिरताना दिसेल व त्याच्या सासऱ्याचा रोल ... आयला हाच तर खरा प्रश्न आहे. धरमच्या सासऱ्याचा रोल कोण करेल ? संजय दत्त ..... नाही. खान मंडळी तर अजून विशीत आहेत. अर्शद वारसी इतक्यात आत्महत्या करणार नाही. बहुतेक हि जबाबदारी बोम्मनवर सोपवण्यात येईल. तर धरमपाजी हिरोचं काम करेल तर स्टारकास्ट अशी असेल. पण आपल्या सुदैवानं असं काही होणार नाही. असो.


    धरमच्या मानानं शोलेतला जय तथा सदी का महानायक मात्र दुदैवी ठरला. बिचाऱ्याला मनीषा, रविना, सौंदर्या, शिल्पा शेट्टी ते जिया खानच्या पुढे मजल मारता आली नाही. लोकांनीच त्याला ' अब बस ' म्हणत रोखले. नंतर आपली अर्धवट कुरतडलेली दाढी घेऊन गेम शो ते नवरत्न तेल विकण्याच्या जाहिराती करत तो चरित्र भूमिकांकडे वळला. तसंही ते बरं झालं. नाहीतर ' लाल बादशाह ' मधील निरूप रॉय - अमिताभ बच्चन हि माँ - बेटे की जोडी पाहून डोळे मिटायची माझी तीव्रेच्छा झाली होती.


    आपल्याकडे हिरो म्हातारा होत नाही कि लोकं होऊ देत नाहीत ? किचकट सवाल !


    रजनीकांत अजूनही थांबायला तयार नाही. लिंगामध्ये सोनाक्षी व अनुष्का तर आता कबालीत राधिका. हुज नेक्स्ट ? हा मनुष्य एकाच फिल्म मध्ये बाप बनेल तसाच मुलगाही. पण हिरो व वही होगा और हिरॉइन .... ...

     रजनीचं भाग्य कमल हसन, चिरंजीवी सारख्यांना लाभलं नाही. ज्या इकडं चालल्या नाहीत त्या तिकडं त्येंच्यासंगट काम करत होत्या. स्टार्ट टू मनीषा कोईराला, एंड टू सोनाली बेंद्रे, नम्रता शिरोडकर वगैरे वगैरे. नाही म्हणायला कमल को रानी मिली ' हे राम में ' और रानी को उसने जिस तरह पेश किया वो देखकर मेरे भी मुंह से निकल गया, हे राम !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा